आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं.
भारतीय संघानं अमेरिकेच्या संघाचा 47 विरुद्ध 25 गुणांनी सहज पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे बारावं सुवर्ण पदक आहे.संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत या जोडीनं युक्रेनच्या सेरेय कुलिश आणि अॅना इलीना यांना पराभूत करत 50 मीटर रायफलच्या मिश्र स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.
भारतीय नेमबाजांनी सात रौप्य आणि सहा कांस्यपदकं देखील जिंकली आहेत
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.