आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत नीरज कुमार, स्वप्नील कुसळे आणि चयनसिंह यांच्या संघानं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं.

भारतीय संघानं अमेरिकेच्या संघाचा 47 विरुद्ध 25 गुणांनी सहज पराभव केला. या स्पर्धेतलं भारताचं हे बारावं सुवर्ण पदक आहे.संजीव राजपूत आणि तेजस्विनी सावंत या जोडीनं युक्रेनच्या सेरेय कुलिश आणि अॅना इलीना यांना पराभूत करत 50 मीटर रायफलच्या मिश्र स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं.

भारतीय नेमबाजांनी सात रौप्य आणि सहा कांस्यपदकं देखील जिंकली आहेत

 

 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image