गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गाव, शेतकरी आणि कारागीर यांना केंद्रस्थाषनी ठेऊन धोरणं ठरवली पाहिजेत, असं प्रतिपादन केंद्रीय रस्तेद वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल वर्धा इथं ‘वर्धा मंथन २०२१ ग्राम स्वणराजची आधारशिला’ या विषयावर आयोजित दोन दिवसाच्याा राष्‍ट्रीय कार्यशाळेच्याा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

गाव समृद्ध करणं, युवकांना रोजगार देणं तसंच कृषि सुधारणांसाठी संचार, समन्वटय आणि सहयोग या त्रिसूत्रीवर काम करणं आवश्यरक आहे. ग्रामीण उत्पाटदनांना चालना देण्यावसाठी नवनवीन तंत्रज्ञानाबरोबरच विपणन करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

पेट्रोल आणि डीजलला पर्याय म्ह्णून सीएनजी, इथेनॉल, बायोगॅस यांना प्रोत्सारहन दिलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. विदर्भातले नागपुर, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा हे जिल्हेह डीजल मुक्तत करण्यााचं आवाहनही गडकरी यांनी केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image