महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी केलेल्या एकाच अर्जावर कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नुकतीच प्रथमच ऑनलाईन सोडत काढण्यात आली. त्याद्वारे राज्यातील २ लाख शेतकऱ्यांची पारदर्शकपणे निवड केली आहे. यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, विशेष घटक योजना, नविन विहीरी आणि फलोत्पादनाच्या विविध बाबींसाठी या लाभार्थ्यांची निवड केली असल्याचं कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.
ज्यांची निवड झाली आहे त्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही तर पुढच्या आर्थिक वर्षात शेतकऱ्याला नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही. त्याचा या वर्षाचा अर्ज पुढच्या वर्षीही ग्राह्य धरला जाईल, असं भुसे यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.