बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी विविध खबरदारीच्या उपायांबरोबर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रशासनाला अनेक सूचना दिल्या. मध्यप्रदेशात केवळ कावळ्यांमध्येच बर्डफ्ल्यूचा प्रादुर्भाव आढळून आला असून, अजून तरी पोल्ट्री व्यवसायात त्याची लागण झाली नसल्याची माहिती काल देण्यात आली.
राज्यसरकार सतर्क असून, पोल्ट्रीव्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
दरम्यान, आंध्र प्रदेशात बर्ड फ्ल्यूचे एकही प्रकरण आढळून आलेले नसून राज्यातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडीपालन करणाऱ्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाचे संचालक डॉ. अमरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
राज्यातील वन विभाग सर्व परदेशी पक्षांचे अधिवास आणि जंगलातील प्राण्यांवर लक्ष ठेवून आहे असेही कुमार यांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशात बर्ड फ्ल्यूचे एकही प्रकरण आढळून आलेले नसून राज्यातल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोंबडी पालन करणाऱ्या व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे आंध्र प्रदेशच्या पशुसंवर्धन विभागाचे संचालक डॉ अमरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.
राज्यातील वन विभाग सर्व परदेशी पक्षांचे अधिवास आणि जंगलातील प्राण्यांवर लक्ष ठेवून आहे असेही कुमार यांनी सांगितले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.