देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ३० हजार ३७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशात आतापर्यंत ९६ लाख ३६ हजार ४८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या २ लाख ९२ हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशभरात काल १९ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ७५ हजार ११६ इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १ लाख ४६ हजार १११ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर १ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे.

काल दहा लाख ७२ हजार २२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ३१ लाख ७० हजार ५५७ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image