अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किमान तीन वर्षे लागतील - चंपतराय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी किती काळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही, मात्र किमान तीन वर्षे तरी लागतील, असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितले. ते आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निर्मितीला सुरुवात होण्यापासून त्यासाठी जमा होणारा निधी, मंदिराची रचना आणि बांधकाम करणाऱ्या कंपन्या याबाबत चंपतराय यांनी यावेळी माहिती दिली.

मंदिराचे भूमिपूजन झाले असले तरी अजून उभारणीला सुरुवात झाली नाही. मात्र त्याआधीच भक्तिभावाने लोक आर्थिक रूपाने आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यात शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात जमा झाला असल्याचे चंपतराय यांनी सांगितले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image