कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायचे राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात बंदचं आवाहन केलं आहे.

दिल्लीच्या चार सीमा आज बंद राहणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ देखील वाहतुकीसाठी बंद असेल, असं दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.  

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image