कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालायचे राज्यांना दक्ष राहण्याचे निर्देश
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात बंदचं आवाहन केलं आहे.
दिल्लीच्या चार सीमा आज बंद राहणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ देखील वाहतुकीसाठी बंद असेल, असं दिल्ली वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.