राज्यभरातल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच करणार जाहीर


 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यभरातल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता नव्यानं जाहीर केला जाणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज घोषणा केली.

ते पुढे म्हणाले १९ जिल्ह्यातल्या या निवडणूकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० ला कार्यक्रम जाहीर केला होता, पण टाळेबंदीमुळे हा कार्यक्रम रद्द केला गेला. तसंच सुधारित मतदार यादी २५ सप्टेबर रोजी जाहीर करण्यात आली.

त्यामुळे नव्यानं नाव नोदवल्या गेलेल्या मतदरांना मतदान करता यावं तसंच निवडणूक लढवता यावी म्हणून लवकरचं ही यादी जाहीर केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image