लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
भारतात तयार होणाऱ्या तांत्रिक सुविधा आता जगभरात उपलब्ध करुन द्यायला हव्यात असं ते म्हणाले. गेल्या महिन्याभरात आर्थिक देवघेवीसाठी २ अब्ज वेळा तर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, स्वामीत्व योजना यासाठी अनेकदा तंत्रज्ञान सुविधेचा वापर देशात झाला असून तंत्रज्ञानामुळे लोकोपयोगी योजना झपाट्यानं पोहचू शकतात असंही प्रधानमंत्री म्हणाले.
आजपासून सुरु झालेली ही परिषद तीन दिवस चालणार असून त्यात ४ हजार प्रतिनिधी सहभागी होत आहेत. २५ देशातले नामवंत तंत्रज्ञ, गुंतवणूकदार, संशोधक या परिषदेला उपस्थिती आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.