इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता 9 वी ते 12 वी या उच्च माध्यमिक विभागातले वर्ग दिवाळी नंतर टप्प्या टप्प्यानं सुरू केले जातील, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सविस्तर बोलणी झाली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काल संध्याकाळी दिली.
इयत्ता 11 वी प्रवेशा संदर्भात त्या म्हणाल्या की जवळपास 18 लाख विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छूक आहेत,पैकी 11 लाख विद्य़ार्थ्यांच्या ऑनलाईन आणि थेट प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, उर्वरीत 7 लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबद्दल लवकरंच प्रक्रिया पूर्ण केली जाईल. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू करण्याबाबत त्यानंतर विचार केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.