देशातला कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांवर पोचला



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात ७२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. याबरोबरच देशातला कोरोनामुक्तीचा दर वाढून ८८ टक्क्याच्या पुढे गेला आहे. आत्तापर्यंत देशभरातले ६५ लाख ९७ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 



याच काळात देशभरात ६१ हजार ८७१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे देशभरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४ लाखापेक्षा जास्त झाली आहे.


या चोवीस तासात देशभरात १ हजार ३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १४ हजार ३१ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामृत्यू दर १ पुर्णांक ५२ शतांश टक्के इतका आहे.


देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही घट  झाली. सध्या देशभरात ७ लाख ८३ हजार कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image