राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ७८.२६ टक्क्यावर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १९ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे.
काल दिवसभरात आणखी १४ हजार ९७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ झाली आहे. राज्यभरात काल ४३० रुग्णांचा मृत्यू झाला.
या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.