राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ७८.२६ टक्क्यावर


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १९ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. 

काल दिवसभरात आणखी १४ हजार ९७६ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ६६ हजार १२९ झाली आहे. राज्यभरात काल ४३० रुग्णांचा मृत्यू झाला.

या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३६ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image