इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

यानुसार, विद्यार्थांना, वह्या पुस्तकं, पेन्सिल, पेन, पाण्याच्या बाटल्या यांची देवाण-घेवाण करता येणार नाही. तसंच शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कमीत कमी ६ फुट अंतर राखणं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणं बंधनकारक असेल.


Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image