इयत्ता ९वी ते १२वीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात, येत्या २१ तारखेपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांच्या शाळा ऐच्छिक तत्वावर सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
यानुसार, विद्यार्थांना, वह्या पुस्तकं, पेन्सिल, पेन, पाण्याच्या बाटल्या यांची देवाण-घेवाण करता येणार नाही. तसंच शाळेत कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
शाळेत येण्यासाठी पालकांची लिखित परवानगी असणं आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कमीत कमी ६ फुट अंतर राखणं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मास्क घालणं बंधनकारक असेल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.