लॉकडाऊनमुळे थांबलेलं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम पुन्हा सुरु
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे थांबलेलं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचं काम पुन्हा सुरु झालं आहे, मात्र १२ हजार ५९ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेलं नाही, अशी माहिती नांदेड इथल्या भारतीय स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखाहून जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असून त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्जाचा लाभ मिळाला आहे. तेव्हा उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.