इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इंडिया आघाडीकडे विकासाचं कोणतंही धोरण नसल्यानं त्यांच्यात विसंवाद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. देशाची सूत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे देण्याचं जनतेच्या मनात असून पुन्हा मोदी सरकारच येणार असल्याचं ते म्हणाले. आगामी निवडणुका भाजपा मित्र पक्षांच्या साथीने लढवणार असून जागा वाटपात कोणत्याही अडचणी नसल्याचं फडणवीस  यांनी यावेळी सांगितलं.  

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image