कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कलम ३७० आणि ३५ अ संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे घटनात्मक एकात्मता वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका ब्लॉगवरच्या लेखात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याबाबत ऐतिहासिक निर्णय दिला असल्याचं त्यांनी या लेखात नमूद केलं आहे. काश्मीर ने सात दशकांपासून हिंसाचार आणि अस्थिरतेचे सर्वात वाईट स्वरूप पाहिले आहे. लहानपणापासूनच जम्मू-काश्मीर आंदोलनाशी जोडण्याची संधी मिळाली असल्याचं मोदी यांनी या लेखात म्हटलं आहे.