राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालं असून इथं सव्वा लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर हिंगोली, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना जिल्ह्यात शेतीच्या १० हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं. राज्यातल्या एकूण २२ जिल्ह्यांमधल्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला. यात प्रामुख्यानं तूर, हरभरा, कापूस, गहू, भाजीपाला, फळपीकांचं नुकसान झालं.