सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून आता जनता दरबार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या नऊ मंत्र्यानी आठवड्यातून ५ दिवस जनता दरबार भरवून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.त्यानुसार दादा भुसे आणि उदय सामंत दर सोमवारी,शंभुराज देसाई आणि संदिपान भुमरे दर मंगळवारी,दीपक केसरकर आणि तानाजी सावंत दर बुधवारी,अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील दर गुरुवारी तर संजय राठोड दर शुक्रवारी जनता दरबाराचं आयोजन करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.