लोकसेभच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचं माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): लोकसेभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची केंद्र सरकारची कोणताही विचार नाही, विरोधक खोटा प्रचार करुन देशवासियांना भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. पंजाब इथं कपुरथला मध्ये आयोजित “माझी माती माझा देश” कार्यक्रमानंतर एका खाजगी वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा आरोप केला. पाच राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुका पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही इरादा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तामिळनाडुचे क्रीडामंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या टिप्पणीवर उत्तर देताना ते म्हणाले की, इंडिया आघाडी देशात धृवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.