दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल -आमदार बच्चू कडू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल, अशी ग्वाही 'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान'चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे. ते आज रायगड जिल्ह्यात पनवेल इथं 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' या अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलत होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी राज्य शासनानं 82 शासन निर्णय निर्गमित केले आहेत. दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image