देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नसल्याचं मोहन भागवत यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात समान नागरी कायदा लागू करणं सध्या शक्य नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सांगितलं. सोलापूर इथं आज भागवत यांनी संघ स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं. २०२४ च्या निवडणुकांपूर्वी केद्र सरकार समान नागरी कायदा करेल, अशी चर्चा देशभर होत आहे,. मात्र भाजपा सरकारचं राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे २०२४ पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणं शक्य नाही, असं ते म्हणाले. देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू होणं आवश्यक आहे. आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे, असं भागवत यांनी सांगितलं.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image