हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे - मंत्री किरेन रिजिजू
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली : हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला भेट दिल्यानंतर ते आज बोलत होते.
IITM कडे सध्या चार पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी लवकरच IITMला दहा पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर प्रदान केला जाईल. हवामानातले बदल आणि त्याचे वेगवेगळे परिणाम लक्षात घेता नागरिकांनी हवामानाचा अंदाज समजून घेण्यासाठी नियमितपणे IMD वेबसाइटला भेट द्यावी, असं रिजीजू यांनी सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी IITM च्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय ख्यातीची उष्णकटिबंधीय हवामानशास्त्राची प्रमुख संस्था म्हणून त्यांनी IITM चं कौतुक केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.