हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे - मंत्री किरेन रिजिजू

 

नवी दिल्ली : हवामानाच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाज आवश्यक आहे, असं केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला भेट दिल्यानंतर ते आज बोलत होते.

IITM कडे सध्या चार पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर असल्याची माहिती देताना ते म्हणाले की, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी लवकरच IITMला दहा पेटाफ्लॉप क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर प्रदान केला जाईल. हवामानातले बदल आणि त्याचे वेगवेगळे परिणाम लक्षात घेता नागरिकांनी हवामानाचा अंदाज समजून घेण्यासाठी नियमितपणे IMD वेबसाइटला भेट द्यावी, असं रिजीजू यांनी सांगितलं. तत्पूर्वी त्यांनी IITM च्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय ख्यातीची उष्णकटिबंधीय हवामानशास्त्राची प्रमुख संस्था म्हणून त्यांनी IITM चं कौतुक केलं.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image