जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं आहे. जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची तिसरी बैठक आजपासून गुजरातमधे गांधीनगर इथं सुरु झाली. बैठकीचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य, शाश्वत वित्तपुरवठा आणि पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, आणि आर्थिक समावेशन या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. जी २० देशांचे, अतिथी देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे मिळून पाचशेहून अधिक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत.

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image