राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्क्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं घसरत असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढतो आहे. काल राज्यात ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर त्यापेक्षा, बरे झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३१ हजारांनी जास्त म्हणजे ७१ हजार ९६६ इतकी आहे. काल ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ७९ हजार ९२९ जणांना कोरोनाची करोना झाली. त्यापैकी ४५ लाख ४१ हजार ३९१ बरे होऊन घरी गेले. तर, ७७ हजार १९१ रुग्ण दगावले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर १ पूर्णांक ४९ शतांश टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत तपासलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक ३५ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image