भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ - परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत बोलत होते. भारत हा टांझानियाचा सर्वोत्तम व्यापारी भागीदार असून भारत ही भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 

जयशंकर दार एस सलाम इथं राजदूत स्तरीय परिषदेलाही उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी विविध देशांबरोबर असलेल्या भारताच्या संबंधांचा आढावा घेतला. दार एस सलाम इथं स्वामी विवेकानंद संस्कृती केंद्रात स्वामी विवेकानंद यांच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण जय शंकर यांनी केलं. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image