मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना कोणाही सभ्य समाजासाठी घृणास्पद असून घटनेतल्या दोषींना कठोर शासन केले जाईल. असेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.