मणिपूरमधील हिंसाचार घटनेतील दोषींना कठोर शासन केले जाईल- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पुर्वी अधिवेशन सुरू होण्यापुर्वी माध्यमांशी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ही घटना कोणाही सभ्य समाजासाठी घृणास्पद असून घटनेतल्या दोषींना कठोर शासन केले जाईल. असेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image