रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे मार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-हर्णे मार्गावर आसूद इथं ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. काही जखमींना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. 

या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे, तसंच मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चानं  करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिक माहिती घेतली. 

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image