प्राप्तिकर विभागाकडे १ कोटीहून अधिक परतावा अर्ज दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा अर्ज कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे. गेल्यावर्षी आठ जुलै पर्यंत एक कोटी प्राप्तिकर परतावा अर्ज दाखल करण्यात आले होते.

करदात्यांना सुविधा मिळावी आणि प्राप्तिकर परतावा मिळण्याचा वेग वाढावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयटीआर अर्ज लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहन प्राप्तिकर विभागानं करदात्यांना केलं आहे. 

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image