प्राप्तिकर विभागाकडे १ कोटीहून अधिक परतावा अर्ज दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा अर्ज कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे. गेल्यावर्षी आठ जुलै पर्यंत एक कोटी प्राप्तिकर परतावा अर्ज दाखल करण्यात आले होते.

करदात्यांना सुविधा मिळावी आणि प्राप्तिकर परतावा मिळण्याचा वेग वाढावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयटीआर अर्ज लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहन प्राप्तिकर विभागानं करदात्यांना केलं आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image