आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत आणि भरतप्रीत सिंग याने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऱेझोअनाने 53 पूर्णांक 31 शतांश सेकंदात 400 मीटर अंतर पार केले.

या वर्षाच्या सुरुवातीला 18 वर्षाखालील आशियाई मैदानी खेळांच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर, रेझोआना आता 18 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील या दोन्ही प्रकारांमध्ये चारशे मीटर प्रकारातली आशियाई अजिंक्यवीर ठरली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image