राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपुजन झालं त्यावेळी ते बोलत होते. विकासाची प्रक्रिया वेगवान असावी आणि त्यातून शाश्वत विकास घडावा यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखीत केलं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, २५ आणि ५८शी संबंधीत प्रकल्प देशाला समर्पित केले.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image