भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही - माजी मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत बोलत होते. भाजपच्या पक्षविस्ताराच्या धोरणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले… 

“भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नकोयत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोकं नकोयत. हा कुठला न्याय आहे? हा कुठला पक्ष आहे? कोणता पक्षवाढीचा हा विषय? आज माझ्याकडे नाव, चिन्ह नसतांनासुद्‌धा जनसागर उसळतोय, हा माझा पक्ष आहे. ही माझी शक्ती, ही माझी ताकत आहे. आणि शिवसेना प्रमुखांचे आशिर्वाद आहेत. पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत, ती आपल्याला डोईजड होणारेत, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना पक्षातून काढून टाकायचं, पक्षातून ते जातील असं बघायचं. आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं हा कोणता न्याय आहे?”