स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख दशरथ तांभाळे यांनी दिली आहे. अन्य ६५९ शेतकरी उत्पादक कंपन्यांना उप-प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक मान्यता देण्यात आल्याची माहिती तांभाळे यांनी दिली. स्मार्ट प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळत असून हा प्रकल्प मुख्यतः कृषि विभाग आणि अन्य संलग्न विभागामार्फत राबवण्यात येतो. या प्रकल्पाच्या अंतर्गत गोदाम, शीतगृह, अवजार बँका, प्रक्रिया उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभ्या केल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे २०० शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी एकंदर ११७ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image