राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचा ४९ विद्यापीठांशी करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं हा या कराराचा उद्देश आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासह गंगा नदीची स्वच्छता आणि शुद्धता सुनिश्चित करणं हे नमामि गंगे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी सांगितलं. जीवन जगण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठांमध्ये वादविवाद आणि इतर स्पर्धा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image