‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं राज्यसरकारचं आवाहन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : 'एच३एन२’ फ्लूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन  राज्यसरकारांना केलं आहे. ‘एच३एन२’ फ्ल्यूच्या प्रकारातल्या शीतज्वराची लाट देशात आली आहे. वातावरणातला बदल, धुळीचं प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचं तज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर कोवीड-१९ साथ रोगाचा अनुभव विचारात घेता राज्य शासनानं 'एच३एन२' बाबतही योग्य उपाययोजना करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image