राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातर्फे विधीज्ञ तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. सत्तेत सहभागी असलेल्या आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे काय काढू शकतात, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला. शिंदे गटाचे आमदार जर शिवसेनेचे सदस्य असतील, तर सभागृहात बहुमताचा संबंधच काय, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. सुमारे तीन वर्ष सत्तेत राहिल्यानंतर ३४ आमदारांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्नही न्यायालयानं शिंदे गटाच्या भूमिकेवर विचारला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image