भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला ते आज संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शहर नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. वाहतूक तसंच पायाभूत सुविधांचं नियोजन आणि जलव्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्रं असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. शहराच्या विकासाबरोबरच मानवकेंद्री विकासही सुनिश्चित केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.