राज्यातल्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढं पुन्हा सुनावणी सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली. आता सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूनं अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीच्या मुद्यावर युक्तिवाद केला. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाच्या बाजूनं नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला. हे प्रकरण याच आठवड्यात पूर्ण करण्याची न्यायालयाची इच्छा असल्याचे संकेत सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान दिले.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image