मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही - मुंबई उच्च न्यायालय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात केलेली याचिका निकाली काढली आहे.

न्यायमूर्ती आर. डी . धनुका आणि एम. एम. साठे यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. हा प्रकल्प देशासाठी अतिशय महत्त्वाचा असल्यानं खासगी समुहाच्या हितसंबंधांपेक्षा जनहिताला अधिक महत्त्व दिलं जावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image