केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं आहे - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील समाजाच्या सर्व स्तरातल्या नागरीकांचा विचार केला असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

पक्षाच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात गरीब आणि मध्यमवर्गीय नागरीकांशी संवाद साधून त्यांना अर्थसंकल्पातल्या विविध योजनांची माहिती द्यावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत केलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image