प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींकडून २७ अनिवासी भारतीयांचा सन्मान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अनिवासी भारतीयांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं अनेक उपाययोजना केल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली आहे. १७ व्या प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते २७ जणांना प्रवासी भारतीय दिवस सन्मानानं गौरवण्यात आलं. शिक्षण, कला, संस्कृती, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान केला.