परदेशातील भारतीय समुदायाची समूहशक्ती देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल – राष्ट्रपती
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): परदेशातील भारतीय समुदायाची समूह शक्ती आणि क्षमता भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.इंदूरमध्ये आयोजित सतराव्या प्रवासी भारतीय दिन संमेलनाच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या.
परदेशी भारतीय कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं.या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 27 जणांना प्रवासी भारतीय दिन सन्मान प्रदान करण्यात आले.शिक्षण, कला, संस्कृती, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यावेळी उपस्थित होते.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.