भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंकेदरम्यान पुढील महिन्यापासून प्रवासी बोट सेवा सुरु होणार आहे. भारतातील पुदुच्चेरी आणि श्रीलंकेच्या जाफना शहरातील कनकेसंथुराई बंदर यांच्या दरम्यान या बोटी ये-जा करतील.

भारत सरकारनं या सेवेकरता संमती दिल्याचं श्रीलंकेचे बंदर आणि जहाज उद्योग मंत्री निमल श्रीपाद डिसिल्वा यांनी सांगितलं. दक्षिण भारतातून श्रीलंकेतील त्रिंकोमाली आणि कोलंबो इथंही प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्यात येतील असंही ते म्हणाले. 

एकेरी प्रवासाकरिता प्रति प्रवासी सुमारे पाच हजार रुपये शुल्क आकारावं लागेल आणि प्रत्येक प्रवासी 100 किलोपर्यंत सामान नेऊ शकेल असं बोट सेवा देणाऱ्या आयोजकांनी सुचवलं आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image