मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृह आणि वित्तविभागाच्या आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या बैठकीत अनेक बाबींचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या बैठकीत राज्याच्या आर्थिक स्थितीचा तसंच सायबर सुरक्षेचाही आढावा घेतला गेला. आर्थिक कारणांमुळे जामिन मिळत नसलेल्यांना कायदेशीर मदत करण्यासारख्या कारागृहाशी संबधित सुधारणा राज्य सरकारच्या विचाराधीन आहेत, असंही ते म्हणाले. इतर राज्यांमधले उत्तम उपक्रम आणि योजनांची माहिती घेऊन उत्तमोत्तम योजना राज्यात राबवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.