शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे. हैदराबादमधील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या सहाव्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते.

सरकार कृषी क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असून कोविड साथीच्या काळात कृषी क्षेत्रानं देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी त्यांनी उद्घाटन केलेल्या कृषी चाणक्य इमारतीचा संदर्भ देत अशा सुविधा कृषी क्षेत्रातील स्टार्ट-अपला चालना देतील, असा विश्वास तोमर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली. नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आलं तर तीन माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image