संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, प्रधानमंत्र्यांचा विश्वास
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उपयुक्त आणि फलदायी ठरेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसद हे खुल्या मनानं चर्चा करायचा मंच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सखोल चिंतन आणि चर्चा करायचं आवाहन त्यांनी सर्व संसद सदस्यांना केलं आहे. राष्ट्रपतीपद आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत असल्यामुळे संसदेचं हे सत्र महत्त्वाचं आहे. नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती देशाला मार्गदर्शन करतील, असंही ते म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.