औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या  प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एका वृत्त वाहिनीवर ते बोलत होते. नवी मुंबईतल्या नियोजित विमानतळाला स्थानिक नेते दीना बामा पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावालाही  मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. हे प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरी साठी पाठवले जाणार असून या मंजुरीनंतर  विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका यांचंही नामांतर करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 

आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपला सत्कार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आमदार अब्दूल सत्तार यांच्या पुढाकारानं हे शक्तीप्रदर्शन आणि सत्कार झाला. आमदार सत्तार तसंच आमदार संदीपान भुमरे यांचं भाषण यावेळी झालं. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image