उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये राऊत यांमुळे दरी निर्माण - दीपक केसरकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे बंडखोर दीपक केसरकर यांनी आज एक खुलं पत्र लिहून महाविकास आघाडीऐवजी भाजपासोबत युती करण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे. उद्धव ठाकरे आणि बंडखोरांमध्ये दरी निर्माण केल्याचं काम राऊत यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच हे बंड नसून शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचा दावा केला आहे.

शिवसेना हिंदूत्वापासून दूर नेणार असाल तर ते कसं खपवून घ्यायचं, असा सवाल त्यांनी या पत्रात केलाय. संजय राऊतांच्या सल्ल्यानं पक्ष चालणार असेल. त्यांचे ऐकून आमच्या सारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जाणार असेल तर आम्ही काय करायचं असा सवाल त्यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image