आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे गाडीचा समावेश आहे. ही गाडी 5,6,8,11,12 आणि 13 जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ही गाडी याच दिवशी पंढरपूर इथून दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी सुटेल आणि लातूरला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image