कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट येईल तर ३ आणि ४ मे रोजी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ४२ तर काही ठिकाणी ४० अंशांच्या आसपास तापमान होतं. ६ मे पर्यंत पुणे परिसरात ४० अंशापर्यंत तापमान राहील. दरम्यान, चार मे पर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. मराठवाडा, विदर्भात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.  

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image