दाओसमध्ये विविध कंपन्यांसोबत राज्याचे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांमधल्या २३ कंपन्यांनी काल राज्याशी एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.

या गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यापेक्षा जास्त अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांमधली आहे. यामध्ये प्रामुख्यानं औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प आणि अन्न प्रक्रिया, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image