दाओसमध्ये विविध कंपन्यांसोबत राज्याचे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांमधल्या २३ कंपन्यांनी काल राज्याशी एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
या गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यापेक्षा जास्त अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांमधली आहे. यामध्ये प्रामुख्यानं औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प आणि अन्न प्रक्रिया, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.